पिकविम्या प्रश्नी शिवसेनेचे खासदार थेट पंतप्रधानांच्या भेटीला
नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी शिवसेनेने पिक विमा संदर्भात मुंबईत वांद्रे-कुर्ला संकुलात विमा कंपनी विरोधात मोर्चा काढला होता. यानंतर काल शिवसेनेच्या सर्व खासदारांनी या विषयासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पिक विमा वितरणातल्या अडचणींचा पाढा पंतप्रधानांसमोर मांडला.
गेले काही दिवस पिक विम्या प्रश्नी आक्रमक असलेल्या शिवसेनेने हा विषय पंतप्रधानांपर्यंत नेल्यामुळे सगळेच अवाक झाले आहेत. पिक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या ४७३ कोटी रुपयांवर डल्ला मारल्याचा थेट आरोप सेनेच्या खासदारांनी केला. आणेवारी बाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. सदर बैठकीनंतर लोकसभेतील शिवसेना गटनेते खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधानांनी योजनेतील त्रुटी दूर करण्याचे आश्वासन दिल्याचे म्हटले आहे.