राम मंदिर प्रकरणी १८ ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद पूर्ण करा : सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली: अयोध्येतील राम मंदिर प्रकरण अंतिम टप्प्यात म्हणजे अखेरच्या सुनावणी जवळ आलंय असे आता म्हणायला हरकत नाही. सध्या सुनावणीदरम्यान जर कोणी मध्यस्थी करत असेल तर त्यास सर्वोच्च न्यायालयाची कोणतीही हरकत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सर न्यायाधीश रंजन गोगोई यांनी पक्षकारांना १८ ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद पूर्ण करण्यास सांगितले आहे यासाठी शनिवारी ही सुनावणी घेण्याबाबत समर्थता दर्शविली आहे. एकूणच या सर्व घटना क्रमानुसार असे दिसते की अंतिम निकाल नोव्हेंबरपर्यंत लागू शकतो.