स्वातंत्रवीर सावरकर देशाचे पाहिले पंतप्रधान झाले असते तर पाकिस्तानची निर्मितीच झाली नसती : उद्धव ठाकरे
मुंबई: मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृहात वीर सावरकरांवरील एका पुस्तक प्रकाशन सोहळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. या वेळी ते म्हणाले की स्वातंत्रवीर सावरकर देशाचे पाहिले पंतप्रधान झाले असते तर पाकिस्तानची निर्मितीच झाली नसती.
लेखक विक्रम संपथ लिखित ‘सावरकर इकोज फ्रॉम फर्गटन पास्ट’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की आपल्याला रत्नाची पारख नसेल तर जागतिक पातळीवर आपली नाचक्की होते. आमचं सरकार हिंदुत्ववादी सरकार आहे, त्यामुळे मी सावरकरांना भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी केंद्राकडे केली आहे.