राम मंदिर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात चालू आहे तर हे भाषणबाज कुठून आले : पंतप्रधान नरेंद्र मोदी
नाशिक: मी पाहतोय की गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून काही भाषणबाज लोकं राम मंदिरा बाबत उलट-सुलट वक्तव्य करत आहेत असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेकांचे कान टोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोप प्रसंगी नाशिक येथे आले होते. या वेळी आपल्या भाषणात त्यांनी हे वक्तव्य केलं.
पुढे ते म्हणाले की, “जर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात चालू आहे तर हे भाषणबाज कुठून आले. आपला स्वतःच्या न्यायाप्रणाली आणि संविधानावर विश्वास असणं गरजेचं आहे. मी देशभरातल्या भाषणबाजांना हात जोडून विनंती करतो की प्रभू श्रीरामासाठी भारताच्या न्यायप्रणालीवर आपली श्रद्धा ठेवा.