जम्मू-काश्मीर मुस्लिम बहुल असल्यामुळे तिथून कलम ३७० रद्द करण्यात आलं; पी. चिदंबरम यांची मोदी सरकारवर टीका
चेन्नई: माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी कलम ३७० रद्द केल्याच्या निर्णयामुळे केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. काल रविवार दिनांक ११ रोजी चेन्नई ते म्हणाले की मोदी सरकारने जम्मू-काश्मीर मधून अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा निर्णय यासाठी घेतला कारण तिथे मुस्लीम समुदाय बहुसंख्यांक आहे. पुढे चिदंबरम म्हणाले जम्मू-काश्मीर भारताचाच भाग आहे भाजप सोडून यात कोणालाच शंका नाही.
जी लोकं ७२ वर्षांचा इतिहास जाणत नाही त्यांनी फक्त शक्तिप्रदर्शन करण्यासाठी कलम ३७० रद्द केलं आहे. संविधानाच्या कलम ३७१ च्या अनेक खंडानुसार अनेक राज्यांना विशेष दर्जा दिला गेला आहे. सध्या कलम ३७० रद्द केल्यामुळे काँग्रेस आणि भाजपमध्ये राजकीय शिमगा चालू आहे.