Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

श्रावणात उपवास करताय? मग हे जरूर वाचा आणि अमलात आणा

श्रावणात उपवास करताय? मग हे जरूर वाचा आणि अमलात आणा


आयुर्वेद कुतूहल
उपवास (लंघन)
चातुर्मास, श्रावण म्हटलं की उपवास हे आलेच, पण आपण जे उपवास करतो ते कितपत योग्य आहेत?, देहाची आणि मनाची शुद्धी जी उपवासाने अपेक्षित असते ती होते का?
उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे सानिध्य खरे तर देवाचे सानिध्य हा उपवासाचा अध्यात्मिक अर्थ आहे, परंतु आपण त्यावेळी जे अन्न सेवन करतो ते कितपत योग्य आहे? खरे तर उपवास करताना लंघन आवश्यक आहे. लंघन म्हणजे लघु अन्नाचे सेवन करणे, म्हणजेच असा आहार घेणे कि जो पचायला हलका असला पाहिजे. ज्यामुळे आपल्या पाचन शक्तीवर अधिक ताण पडणार नाही.

## लंघन व त्याचे प्रकार

आपल्या कार्यक्षमतेच्या व पाचन शक्तीच्या आधारे लंघन अथवा उपवास वेगवेगळ्या प्रकारे केला जातो.
१) निराहार – काहीही न खाता फक्त पाण्यावर राहणे.
२) दुग्ध आहार – फक्त दूध पिणे.
३) फल – कंद आहार.
४) एक भुक्त – फक्त एकच समय अन्न सेवन करणे.
ह्या प्रकारच्या लंघनामुळे अग्नीला म्हणजे पाचन शक्तीला बल प्राप्त होते. ह्यामुळे पाचन संस्थेशी निगडित विकार आपणास सहसा होत नाहीत, त्यामुळे बऱ्याचशा रोगांना आळा बसतो व शरीराचे आरोग्य उत्तम राहते.
परंतु आजकाल उपवासाच्या नावाखाली साबुदाणा, बटाटा, केळ्याचे वेफर्स, शेंगदाण्याचे पदार्थ व इतर तेलकट, जास्त प्रमाणात फळांचे रस इत्यादी पदार्थ सेवन केले जातात. जे पचायला अत्यंत जड आणि पचन संस्थेला हानिकारक आहेत. लंघन, उपवासाचा मूळ उद्देश्य हा पाचन संस्थेला अराम आणि भुकेवरील आपला ताबा हा आहे आणि आपण ह्या मूळ उद्देशाला विसरतो व उपवासाच्या नावाखाली जिभेचे चोचले पुरवत असतो.

## उपवासाच्या वेळी खाण्याचे पदार्थ

१) वरी तांदळाचा भात व ताक, राजगिऱ्याचे लाडू हे पचायला हलके असतात त्यामुळे ते उपवासास चालतात.
२) मुद्ग युष – आयुर्वेदात मूगास अनन्य महत्व आहे. लंघन समयी ह्याचा वापर केला जातो. कोकण प्रांतात उपवासाच्या वेळी मुगाची सोजी खाण्याची प्रथा आहे. पचायला हलके व शरीरास सर्व सत्व पुरवणारे असल्याने ह्याचे सेवन करण्यास हरकत नाही किंबहुना योग्यच आहे.
३) फलाहार- फलाहार हा अखंड फळे खावीत ना कि त्यांचा रस करून त्यांचे सेवन करावे, तसेच मिल्क शेक देखील सेवन करणे अयोग्य आहे.
४) कंदमुळे – उपवासात अनेक कंदांचा उपयोग होतो, ते उकडून अथवा तळून खातात त्या ऐवजी कंद हि भाजून खावीत जेणे करून ती पचायला हलकी होतात.

थोडक्यात काय तर उपवास (लंघन) हे आपल्या देहाची आणि मनाची शुद्धी करण्याचे उत्तम साधन आहे, ह्यामुळे आपली पचनशक्ती स्थिर व सुदृढ बनते. सहसा ह्या दिवसांमध्ये वर दिल्या प्रमाणे लंघन करावे व अन्नाचे सेवन देखील पोटाला तडस लगे पर्यंत करू नये ते हलकेच असावे अगदी उपवासाचे पदार्थ सुद्धा त्याच मात्रेत असावेत. ह्यामुळे शरीरास फायदा नक्की होईल.
मग ह्या श्रावणात ठरवून उपवास नक्की करा पण तो शरीराला सुदृढ बनवेल असा.

भेटूया पुढल्या लेखात नवीन विषय घेऊन तोपर्यंत
आयुष्य जगा आयुर्वेदा संगे ।।

लेख आवडला असल्यास   शेअर करा  ।   LIKE  करा  ।  कंमेंट करा  

वैद्य शार्दुल चव्हाण
एम. डी. आयुर्वेद
9987925720
जगदंब The Ayurvedic World ,
Ayurvedic Clinic and Panchkarma Center

फोटो सौजन्य :

(Disclaimer: सदर लेखातील मते हि लेखक/लेखिकेची स्वतःची मते आहेत. न्युज पोर्टल फक्त एक माध्यम आहे.)

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *