काश्मीर प्रश्नी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून शून्य प्रतिसादामुळे मिळालेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले …
सुरुवातीला भारत सरकारने जम्मू आणि काश्मीरला असलेला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले. हे कलम रद्द केल्यावर पाकिस्तानने खूपच आगपाखड केली. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तर भारताला अप्रत्यक्ष हल्ल्याची धमकी दिली. या नंतर पाकिस्तानला आशा होती की आंतरराष्ट्रीय समुदाय त्यांना सकारात्मक प्रतिसाद देईल पण तसे काही घडले नाही. याच निराशेतून एकाकी पडलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपली व्यथा ट्विटरद्वारे व्यक्त केली आहे.
ते आपल्या पहिल्या ट्विट मध्ये म्हणाले की, “संपूर्ण जग लक्ष ठेवून आहे की संचारबंदी हटवल्यानंतर आवाज दडपण्यात आलेल्या काश्मीरमध्ये काय घडतंय भाजपच्या सरकारला वाटते का की काश्मीर मध्ये जास्तीच लष्करी बळ वापरून काश्मीरमधील स्वातंत्र्यचळवळ थांबवली जाऊ शकते? उलट या चळवळीला चालना मिळू शकेल”
आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये ते म्हणतात एक गोष्ट स्वाभाविक असेल की आंतरराष्ट्रीय समुदायाला काश्मीरमध्ये नरसंहार पाहायला मिळू शकतो. आंतरराष्ट्रीय समुदाय पुन्हा एक वांशिक संहार पाहणार आहे की, हे सर्व थांबवण्याचे नैतिक धारिष्ट्य दाखवणार आहे असा प्रश्न त्यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये विचारला आहे. इम्रान खान यांना पाकिस्तानी लष्कराकडून ठाम भूमिका घेण्याबाबत दबाव येत असल्याचे मानले जाते.