Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राज्यातील ५०० कार्यालयांमध्ये शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्ष सुरु; अलिबागमध्ये कृषिमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

राज्यातील ५०० कार्यालयांमध्ये शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्ष सुरु; अलिबागमध्ये कृषिमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: शेतकरी बांधवांना अडचणी मांडण्यासाठी, विविध योजनांची माहिती मिळावी याकरिता हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी तालुका, जिल्हा पातळीवरील कृषी कार्यालयात शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्ष सुरु करण्यात आला आहे. या मोहिमेचा शुभारंभ रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथून कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आला. राज्यभर सुमारे ५०० कार्यालयांमध्ये अशी केंद्र सुरु करण्यात आल्याचे कृषिमंत्र्यांनी येथे सांगितले.

कृषिमंत्र्यांनी काल शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्ष सुरु करणे तसेच तालुका स्तरावर शेतकरी समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याची अंमलबजावणी करीत राज्यभर अशी मार्गदर्शक केंद्रे सुरु करण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला असल्याचे कृषिमंत्री श्री.भुसे यांनी सांगितले. यासंदर्भात विभागामार्फत शासन निर्णयदेखील जाहीर करण्यात आला असून त्यामध्ये मार्गदर्शन कक्ष व समितीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

शेतमालाची उत्पादकता व उत्पन्नात सातत्य ठेवण्यासाठी शासनाच्या विविध विभागांमार्फत शेतकऱ्यांसाठी ज्या योजना राबविल्या जातात त्यांच्या अंमलबजावणीमध्ये समन्वय साधण्याकरिता तालुकास्तरीय समिती महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असे कृषिमंत्री श्री.भुसे यांनी सांगितले.

जिल्हा कार्यालयांमध्ये सुरु करण्यात येणाऱ्या शेतकरी सन्मान व मार्गदर्शक कक्षांमध्ये शेतकऱ्यांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी. त्यांचे म्हणणे समजून घ्यावे, त्यावर योग्य ते मार्गदर्शन करत शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनांबाबत देखील मार्गदर्शन करावे, असे आवाहन कृषिमंत्र्यांनी केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कृषी विभागामार्फत शेतकरी केंद्रबिंदू ठेवून योजना राबविण्यात येत आहेत. त्या दृष्टीने शेतकऱ्यांचे उत्पन्नवाढीसाठी तालुकास्तरीय समितीची दर तीन महिन्यांनी बैठक होईल. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केली जाईल. हवामान, पीक परिस्थिती, विपणन, निविष्ठांचा पुरवठा, पीककर्ज, शेतीपूरक जोडव्यवसाय, वीज जोडण्या, शेतकरी कर्जप्रकरणे आदींबाबत या समितीच्या बैठकीत चर्चा होईल.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *