Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, राज्यातील १४ लोकसभा मतदारसंघामध्ये अटीतटीचा सामना

तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, राज्यातील १४ लोकसभा मतदारसंघामध्ये अटीतटीचा सामना

लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. देशभरातील १५ राज्यांमधल्या ११६ जागांसाठी आज मतदान होणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, बारामती, उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, रावेेर, जळगाव मराठवाड्यात जालना, औरंगाबाद, कोकणातील रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघांमध्ये मतदानाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे.

तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील १४ मतदारसंघांचा समावेश आहे. सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, चंद्रकांत खैरे, धनंजय महाडिक, राजू शेट्टी, केंद्रीय मंत्री अनंत गीते, विनायक राऊत, यासारख्या दिग्गजांचं भवितव्य मतयंत्रांमध्ये बंद होणार आहे.

तिसऱ्या टप्प्यात निवडणुकांच्या तोंडावर सतत चर्चेत राहिलेल्या माढा, अहमदनगर, जालना, सातारा, जळगाव या जागांचा समावेश या टप्प्यात आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *