Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

शरद पवार पंतप्रधान झाले तर देश विकायला काढतील – उद्धव ठाकरे

शरद पवार पंतप्रधान झाले तर देश विकायला काढतील – उद्धव ठाकरे

बुलढाणा: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनखाली खामगावमध्ये बुलडाणा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आपल्या ठाकरी शैलीने उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा चांगलाच समाचार घेतला.

शरद पवारांना थोडी देखील लाज, लज्जा शरम काहीच राहिली नाही. ते जर पंतप्रधान झाले तर देश विकायला काढतील अशा शब्दात ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

गरीबी हटावची घोषणा इंदिरा गांधी यांनी केली होती. गांधींची गरीबी हटली आमचा गरीब तसाच राहिला असा टोला उद्धव ठाकरेंनी यावेळी गांधी घराण्याला लगावला.

राहुल हे हिंदुस्तान आहे, या हिंदूस्थानात तुझ्यासारख्या नामर्दाला जागा नाही. देशद्रोह्यांना जवळ करणाऱ्यांना तुम्ही निवडून देणार का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थितांना केला.

पुलवामा येथे लष्करी जवानांवर जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील दोन लष्करी जवान हुतात्मा झाले. ही मर्दांची भूमी आहे इथे नामर्द जन्माला येऊ शकत नाही. इथले जवान पाकिस्तान समोर छातीचा कोट करून उभे आहेत. याआधी काँग्रेसच्या काळात आपण फक्त खलिते पाठवत होतो. आता युतीच्या काळात आपण एक सोडून दोन सर्जिकल स्ट्राइक केलेले आहेत.सर्जिकल स्ट्राईकवर संशय घेतले जात आहेत. त्यावर राजकारण करू नका, शौर्याचे पुरावे मागू नका, असे ते म्हणाले. शरद पवार साहेब तुम्हीच म्हणाले होते की माझ्या सल्ल्याने सर्जिकल स्ट्राईक झाला, मग तो झाला की नाही झाला याचं उत्तर द्या, असेही ते म्हणाले.

राज्यात तयार झालेलं भगवं वादळ आता कुणीही रोखू शकणार नाही. राहुल गांधींसारख्या नामर्द लोकांच्या हाती आपला देश द्यायचा का? कन्हैय्या, दाऊद यांसारख्यांना वाचवण्यासाठी राहुल गांधींना देशद्रोहाचं कलम रद्द करायचं आहे. देशद्रोह्यांना फासावर लटकवणारं सरकार हवं असेल तर महायुतीला मतदान करा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

राहुल गांधी यांनी एवढा जाहीरनामा आणला मात्र त्यात राम मंदिर बांधण्याचा साधा उल्लेखही नाही. राम मंदिर व्हावं ही शिवसेनेची इच्छा आहे. मी युती केली कारण शेतकऱ्यांचं भलं होणार आहे, जनतेचं भलं होणार आहे आणि राम मंदिर बांधलं जाणार आहे. आमच्यात आणि भाजपात काही खट्टं मीठं नातं होतं. मात्र आता सगळं गोड झालंय अस शेवटी उद्धव ठाकरे म्हणाले.

#UddhavThackarey #SharadPawar #RahulGandhi #rahulgandhi #shivsena #bjp #congress #buldhana #pratpraojadhav

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *