Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

आरोग्य: कोणतेही कडधान्य कधीच कच्चे का खाऊ नये? जाणून घेण्यासाठी क्लिक करा

आरोग्य: कोणतेही कडधान्य कधीच कच्चे का खाऊ नये? जाणून घेण्यासाठी क्लिक करा

आयुर्वेद कुतूहल भाग ४३
शमीधान्य ( कडधान्य)
कडधान्य म्हणजेच द्विदल अथवा शमीधान्य होय. आपल्या आहारात नक्कीच त्यांचे महत्व आहे, आजकालच्या आहारात मोड आलेल्या कडधान्याला विशेष महत्त्व आहे, बरेच लोक proteins साठी sprouts कच्चे खातात. हे कितपत योग्य आहे?, आयुर्वेदाचे कडधान्य बद्दलचे मत काय आहे हे आज आपण पाहूया.
**सामान्यतः कडधान्यांच्या गुणांची चर्चा करताना आयुर्वेद सांगते की ते तुरट रसाची व कटु विपकाची असतात, म्हणूनच शरीरात ते वात अधिक प्रमाणात वाढवतात, मल मूत्रास कमी करतात अथवा क्वचित अवरोध करतात, तसेच पित्त आणि कफ दोषाला कमी करतात.
** परंतु मूग आणि मसूर हि दोन कडधान्य अशी नाहीत ते वातास अधिक प्रमाणात वाढवत नाहीत.
मूग हे आयुर्वेदात अत्यंत पथ्यकारक आहेत, पंचकर्मानंतर, आजार पणात, भुकेची संवेदना कमी असताना शरीराची आहाराची गरज भागविण्यासाठी मुगाचे फोडणी दिलेले अथवा नुसते उकडलेले सूप दिले जाते.
** मसूर हि मधुर पाकी आणि मलास बांधून ठेवणारी आहे अगदी कोणत्याही प्रकारे पचनास त्रास होऊ न देता, म्हणूनच अतिसार व्याधीत ( dysentery , diarrhoea) अशा व्याधीत आहारात ह्याच्या सूप चा उपयोग केला जातो.
मूग आणि मसूर सोडलं तर बाकी सर्व कडधान्य अत्यंत वातूळ व पोटात गुब्बारा धारवणारे असतात मग त्यांचे सेवन करू नये का? करावे परंतु बेताने आणि त्यावर योग्य उपाय करून ज्यामुळे त्याची वातुळता थोडी कमी होईल.

१) उडीद हे एकमेव कडधान्य कफकारक, मलास वाढवणारे व पचायला जड असते म्हणूनच त्याचे सेवन बेतानेच करावे व त्याच्या सेवन समयी आंबट रसांचा वापर करावा.
२) कोणतेही कडधान्य कधीच कच्चे खाऊ नये, कारण ते पचण्यास कठीण आहेत आणि शरीरास योग्य हि नाहीत.
३) विरुढीकृत आहार म्हणजेच मोड आलेले कडधान्य हे पचण्यास अत्यंत जड आहेत, वात व पित्त दोषाला वाढवणारे आहेत, शरीरात दाह, कृमी, मलावरोध निर्माण करणारे आहेत, तसेच डोळ्यांसाठी अहितकर आहेत म्हणूनच आयुर्वेदात मोड आलेली कडधान्ये सेवनास निषिद्ध आहेत.
४) कडधान्यातील महत्वाचे म्हणजे त्यावरील अन्न संस्कार मूग आणि मसूर फक्त क्वचित उकडून खाल्ले तर चालतील परंतु इतर कडधान्यास तेल, तूप व इतर संस्कार आवश्यक आहेत.
कडधान्यांचे गुण-दोष लक्षात घेता त्यांच्या फोडणी मध्ये तेला/तुप सोबत हिंग, मोहरी, लसूण, कांदा, खोबरं अशा प्रकारे वातास कमी करणारे व पचनाला साहाय्य करणाऱ्या घटकांचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे तेव्हाच कडधान्य पचताना त्रास होत नाही.
५) कडधान्य कोणी खाऊ नयेत –
ज्यांना constipation/बद्धकोष्ठ चा त्रास आहे, piles( मूळव्याध) fissure, fistula सारखे गुदगत व्याधी आहेत अशा व्यक्तीनी सहसा मूग सोडून इतर कोणतेही कडधान्य सेवन करू नये.
** डोळ्यांचे विकार व चष्मा असणाऱ्या व्यक्तीनी मोड आलेली कडधान्य खाऊ नयेत.

थोडक्यात
१ मूग आणि मसूर सोडून इतर कडधान्य अधिक वातूळ असतात
२ कुठलीही कडधान्य कच्ची व मोड आणून खाऊ नयेत
३ कडधान्यवर योग्य आहार संस्कार करूनच ते सेवन करावेत.
आहार सदैव पुष्टीकारकच आहे फक्त त्यावर योग्य संस्कार करावेत व अयोग्य टाळावे.

भेटूया पुढल्या लेखात नवीन विषय घेऊन तोपर्यंत
आयुष्य जगा आयुर्वेदा संगे ।।

लेख आवडला असल्यास   शेअर करा  ।   LIKE  करा  ।  कंमेंट करा  

वैद्य शार्दुल चव्हाण
एम. डी. आयुर्वेद
9987925720
जगदंब The Ayurvedic World ,
Ayurvedic Clinic and Panchkarma Center

(Disclaimer: सदर लेखातील मते हि लेखक/लेखिकेची स्वतःची मते आहेत. न्युज पोर्टल फक्त एक माध्यम आहे.)

 

 

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *