शिवसेनेला ‘एनडीए’ तून बाहेर काढणं हे जाणूनबुजून घडवून आणलेलं क्रौर्य आहे : संजय राऊत
मुंबई: भाजपने शिवसेनाला एनडीए बाहेर काढल्यामुळे संतापलेल्या संजय राऊत यांनी आज सकाळी भाजपवर सडकून टीका केली आहे. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, “शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढण्याचा निर्णय भाजपने एकट्याने कसा घेतला, त्यासाठी बैठक घेतली का?”
पुढे ते एनडीए चा इतिहासाबाबत म्हणाले की, “शिवसेना ‘एनडीए’चा संस्थापक घटक पक्ष आहे. शिवसेेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एनडीएचे संस्थापक होते. जॉर्ज फर्नाडीस निमंत्रक होते. फर्नाडीस हे ‘एनडीए’तील सर्व घटक पक्षांशी संवाद साधायचे. ‘एनडीए’च्या नावानं टिव-टिव करणारे ज्यावेळी एनडीए स्थापन झाली, तेव्हा गोधडीत रांगतही नव्हते.”
शिवसेनेला एनडीए तून काढणं म्हणजे क्रौर्य आहे असे म्हणताना ते म्हणाले की, “एनडीए एका पक्षाची नाही. भाजपा मोठा पक्ष आहे. तो मोठा राहावा. पण एनडीएचे प्रमुख कोण आहेत. शिवसेनेला बाहेर काढताना कुणाला विचारलं का. आधी बैठक घ्यायला हवी होती. शिवसेनेनं चुकीच पाऊल उचललं असेल तर आम्ही आमची भूमिका मांडली असती. पण शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढण्याची घोषणा योगायोग नाही. हे जाणूनबुजून घडवून आणलेलं क्रौर्य आहे.”