शरद पवार-उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत खरंच जागा वाटपाचा तिढा सुटला?
मुंबई: सत्तास्थापनेचा तिढा आता जवळपास सुटला असून काल काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दिल्लीतील नेत्यांच्या झालेल्या बैठकीनंतर काल रात्री उशिरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या वरळीतील निवासस्थानी त्यांची भेट घेतली. रात्री ११ वाजता सुरू झालेली बैठक मध्यरात्री १२:१५ वाजता संपली.
या बैठकीत शिवसेनेला १६, राष्ट्रवादीला १५ तर काँग्रेसला १२ खाती देण्याचा फॉर्म्युला ठरल्याचेही कळते. तसेच कोणाकडे कोणते खाते राहील तसेच महामंडळांच्या वाटपाचाही फॉर्म्युला या बैठकीत निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.