रात्रभर पडणाऱ्या पावसाची बॅटिंग अजूनही चालूच, रेल्वे सेवा कोलमडली
मुंबई: गेले दोन दिवस पडत असलेल्या पावसाने काल रात्रीपासून आपला जोर जरा वाढवला आहे. मुंबई, नवी मुंबई, पनवेल, ठाणे, कल्याण परिसर सतत पडणाऱ्या पावसामुळे जलमय झाला आहे. सखल भागात पाणी साचल्यामुळे सकाळी सकाळी लोकांना थोडा त्रास सहन करावा लागला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील २४ तास पावसाचा जोर कायम राहणार आहे. गणपती निमित्त कोकणात आपल्या गावी गेलेल्या भाविकांनाही पाऊस झोडपून काढत आहे.
हार्बर व मध्य मार्गावरील रेल्वे सेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. सकाळी ११ नंतर पावसाचा जोर वाढल्यांनंतर कांजूरमार्ग आणि कुर्ला स्थानकाजवळ पाणी रेल्वे ट्रॅक वर आल्यामुळे मध्य रेल्वे वरील वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. पावसामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रकही प्रभावित झाले आहेत.