Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

अखेर मॉन्सून चे महाराष्ट्रात आगमन झालेच; राज्यात सिंधुदुर्गासाह शेजारी गोव्यातही दिली वर्दी

पुढील २ दिवसात मुंबईत होणार मान्सून चे आगमन

सिंधुदुर्ग, दि. ११: गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या काहिलीने व त्यायोगे होणाऱ्या उष्म्यामुळे हैराण झालेल्या राज्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केरळात दाखल झालेल्या नैऋत्य मॉन्सून ने आज अपेक्षेपेक्षा लवकर महाराष्ट्र व गोव्यात प्रवेश केला आहे. हवामान विभागाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार बिपरजॉय चक्रीवादळाच्या मार्ग बदलामुळे कोकण किनारपट्टीसह पश्चिम किनारपट्टीवर मान्सून साठी पोषक वातावरण तयार झाले आहे.

मान्सून हळूहळू पुढे सरकत असून मुंबईकरांना मान्सून च्या आगमनासाठी आणखी २ दिवस वाट पाहावी लागेल. राज्यातील अनेक भागात पुढील ४-५ दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *