Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

तिसऱ्या टप्प्यातील मतदानात राज्यात कोल्हापूर जिल्ह्यात झाले सर्वात जास्त टक्के मतदान

राज्यात तिसऱ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे ६१.४४ टक्के मतदान

मुंबई, दि. ८ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपली. अकरा मतदार संघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ६१.४४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

रायगड – ५८.१० टक्के
बारामती – ५६.०७ टक्के
उस्मानाबाद – ६०.९१ टक्के
लातूर – ६०.१८ टक्के
सोलापूर – ५७.६१  टक्के
माढा – ६२.१७ टक्के
सांगली – ६०.९५ टक्के
सातारा – ६३.०५ टक्के
रत्नागिरी-सिंधुदूर्ग – ५९.२३ टक्के
कोल्हापूर – ७०.३५ टक्के
हातकणंगले – ६८.०७ टक्के

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *