किरीट सोमैय्या यांनी शिवसेनेवर केला “विश्वासघाताचा” आरोप
कोल्हापूर: महाराष्ट्र भाजपा उपाध्यक्ष, ज्येष्ठ नेते डॉ. किरीट सोमय्या हे आज कोल्हापूर जिल्ह्य दोऱ्यावर होते. अंबाबाई मंदिर येथे दर्शन घेऊन भाजपा जिल्हा कार्यालयात त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला.
याप्रसंगी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, भाजपा कार्यकर्त्यांनी बदलत्या राजकीय समीकरणात आगामी काळात अतिशय दक्षतेने कार्यरत रहावेच लागेल, मोठी भ्रष्टाचारी पार्श्वभूमी असलेल्या दोन्हीही काँग्रेस या निव्वळ सत्तेसाठीच एकत्र आलेल्या असून या सत्ताधा-यांच्या कारभारावर लक्ष ठेवून जनतेच्या प्रत्येक पैश्याचा योग्य वापरासाठीची अंकुश रुपात भाजपालाच जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे आपण सगळ्यानीच दक्ष आणि सजग रहावे.
कार्यकर्त्यांसोबत झालेल्या विविधअंगी चर्चेमध्ये त्यांनी एकेकाळचा आपला मित्र पक्ष ज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या निर्मिती पासूनच अजेंडयावर असणारे काश्मीर प्रश्न, ३७० कलम, अयोध्या राम जन्मभूमी विषय, राम मंदिर निर्मिती, समान नागरी कायदा अशा अनेक प्रश्नांवर एकत्रितपणे निवडणूक लढवली होती. निकाल हाती येताच टोकाची विरोधी भूमिका असणाऱ्या पक्षांसोबत सत्तेसाठीच मतदाराच्या केलेल्या विश्वासघाताचे ऊत्तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला घावे लागेलच” असे घणघणाती प्रतिपादन भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केले.
या प्रसंगी महेश जाधव, राहुल चिकोडे आदीं भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.