३७० कलम रद्द केल्यावर प्रथमतःच आज लष्कर प्रमुख श्रीनगर दौऱ्यावर
श्रीनगर: भारताचे लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत आज (शुक्रवार) श्रीनगर दौऱ्यावर जाणार आहेत. जम्मू-काश्मीर मधून कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच ते तेथे जात आहेत.
लष्करप्रमुख या दौऱ्यादरम्यान काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा व्यवस्था आणि सैन्याच्या तयारीची समीक्षा करणार आहेत. एक दिवस आधीच काल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह पण जम्मू-काश्मीर पासून वेगळ्या केलेल्या लडाख मध्ये होते. या दरम्यान त्यांनी पाकिस्तानच्या सततच्या येणाऱ्या धमक्यांचा समाचार घेतला. ते म्हणाले की, “पीओकेच नाही तर गिलीत-बाल्टिस्तान पण भारताचा भाग आहेत. त्यांनी पाकिस्तानला थेट सवाल केला की काश्मीर पाकिस्तान चा भाग होताच कधी ज्यासाठी ते रडत आहेत?”