“आरक्षण हे जातीवर नाही तर आर्थिक निकषांवर द्यावे. जातीला पोट असते पण….” : आदित्य ठाकरे
अकोला: शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज जनआशिर्वाद यात्रेनिमित्त अकोला दौऱ्यावर आहेत. या वेळी डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठत आयोजित केलेल्या ‘आदित्य संवाद’ या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात उपस्थित शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला.
देशाची खरी शक्ती ही युवाशक्ती आहे. युवा देश घडवणार आहार तेव्हा आपल्या युवांच्या मनात काय आहे? तरुणांचे प्रश्न काय आहेत हे जाणून घेण्यासाठी हा आदित्य संवाद असल्याचे या वेळी आदित्य ठाकरे म्हणाले. इतर राजकीय पक्षांशी तुलना करताना त्यांनी विचारलं की, “नवा देश नवा महाराष्ट्र हा युवा घडवणार आहे. हे करत असताना कोणते राजकीय पक्ष आणि नेते तुमच्याशी अशा पद्धतीचा संवाद करतात? समोर कितीही मोठा नेता असला तरी आत्ताचा तरुणवर्ग प्रश्न विचारायला घाबरत नाही म्हणून व इथे आलो आहे.”
आदित्य ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
# जूनियर केजी ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण असेल त्याची फी ठरवण्यात येईल असा एक कायदा लवकरच येणार आहे.
# मेरीट प्रमाणे तर होईलच पण सर्व विद्यार्थ्यांना समान न्याय देण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला हवा.
# छोट्या शहरात छोट्या गावांमध्ये जर उद्योगधंदे आणायचे असतील तर आपल्याला सध्याची शिक्षण पद्धती आणि आणि अभ्यासक्रम बदलण्याची गरज आहे.
# सर्व स्तरातील लोकांसाठी मूलभूत गरजा उपलब्ध करून देणे यावरती काम करणे गरजेचे आहे तरच आपला देश पुढे जाईल.
# मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आम्ही शिक्षण मोफत देत आहोत त्याचप्रमाणे त्यांना टॅबलेट मोफत वाटप केलेले आहे तसेच प्रायव्हेट शाळांपेक्षा जास्त ऍक्टिव्हिटीज या शाळांमध्ये केल्या जातात.
# मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये देखील जेव्हा शाळेमध्ये प्रवेश हवा असतो तेव्हा मोठ्या प्रमाणात डोनेशन घेतले जातात ते डोनेशन कायदेशीर पद्धतीने घेण्यात यावे अशी मागणी आहे.
# सर्व भाषामध्ये आणि सर्व स्तरातल्या मुलांसाठी शिक्षण पोहोचेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. अभ्यासक्रमामधील बदल हा पुढील ५० वर्षापर्यंत टिकला पाहिजे असा अभ्यासक्रम घडवायचा आहोत.
# हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची ही भूमिका होती की, आरक्षण हे जातीवर नाही तर आर्थिक निकषांवर द्यावे. जातीला पोट असते पण पोटाला कोणतीही जात नसते.
# महिला सुरक्षित राहणे हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. महिला सुरक्षित राहण्यासाठी त्यांना स्वरक्षणाचे क्लासेस मी आणि अक्षय कुमार संपूर्ण महाराष्ट्रात राबवणार आहोत.