कोकण पर्यटन क्षेत्र विकासावर आणि शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनावर सरकारने भर द्यावे – आ. अनिकेत तटकरे
आज विधान परिषदेत आ. अनिकेत तटकरे यांनी देखील सभागृहाला संबोधित केले. मागील सरकारच्या अपयशाचा समाचार घेत आ. अनिल तटकरे म्हणाले की, “ मागील अधिवेशनात विरोधक सत्तेत होते. मात्र, नव्याने निवडून आलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारला काम करण्याची संधी विरोधकांनी द्यावी. आर्थिक परिस्थिती समजून शाश्वत पद्धतीने काम करण्याची भूमिका या सरकारची आहे.”
तसेच राज्यातील पर्यावरण विषयांकडे देखील सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. कोकणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी पर्यटन क्षेत्र विकासावर आणि शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनावर सरकारने भर दिले पाहिजे. शिवाय पाणी पुरवठा योजनांसाठी केंद्र सरकारकडून १० हजार कोटी निधी आला. पण राज्यातील अनेक योजना थांबलेल्या आहे. त्यासाठी सरकारने तात्काळ लक्ष देण्याची विनंती आ. अनिकेत तटकरे यांनी केली.