Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मोठ मोठी लोक चुना लावून देश सोडून गेले, माझा शेतकरी देह सोडून जातो : उद्धव ठाकरे

मोठ मोठी लोक चुना लावून देश सोडून गेले, माझा शेतकरी देह सोडून जातो : उद्धव ठाकरे

मुंबई: मी विमा कंपन्यांना विनंती करतो, आम्हाला आक्रमक व्हायला लावू नका असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज बिकेसी येथील विमा कंपनी च्या मोर्चावेळी दिला. उपस्थितांना संबोधित करताना ते पुढे म्हणाले, “मी सर्व बँकांना, विमा कंपन्यांना १५ दिवसांची मुदत देतोय, १५ दिवसात सर्व कर्जमुक्ती झालेल्या शेतकर्‍यांना पैसे मिळालेचं पाहिजेत.”

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले मुंबईसाठी ज्या शेतकऱ्यांनी रक्त सांडलं आहे त्यांच्यासाठी आज आम्ही इथे आलो आहोत. जो शेतकरी आपलं रक्त आटवून आपल्यासाठी अन्न पिकवत असेल, आपली काळजी घेतो. त्याची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे. मोठ मोठी लोक चुना लावून देश सोडून गेले, माझा शेतकरी देह सोडून जातो असे म्हणत त्यांनी माणुसकीच्या नजरेतून शेतकऱ्यांच्या समस्येकडे पाहावं असं विमा कंपन्यांना सांगितलं.

या मोर्चाला मोठ्या प्रमाणात शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थिती लावली होती.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *