Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राज्यात अवकाळी पाऊस, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

राज्यात अवकाळी पाऊस, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

राज्यात सलग दुसऱ्या दिवशी पुणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव जिल्ह्यात झालेल्या पावसाने कांदा, ज्वारी, उन्हाळी बाजरी आणि आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

कल्याण, अंबरनाथ, बदलापूर व मुरबाड परिसरातही अवकाळी पाऊस झाल्याने पावसामुळे या भागात बराच वेळ वीजपुरवठा खंडीत झाला होता.

सोसायटयाच्या वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्या तर काही ठिंकाणी झाडेही पडली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच पंचाईत झाली.

त्याचप्रमाणे कोल्हापूर, कोकण आणि मराठवड्यात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशी का होईना गरव्याचा दिलासा मिळाला होता.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *