खरंच आर्थिक मंदिला सुरुवात झाली आहे का?; वाहन उद्योगांत चालू आहेत ब्लॉक क्लोजर
पुणे/नाशिक: केंद्र सरकारच्या काही लोकप्रतिनिधींनी व अर्थ क्षेत्रातल्या तज्ञांनी येत्या काळात देशात आर्थिक मंदीचे ढग गडद होणार असल्याचे सूतोवाच केले होते.
महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर काही प्रमुख औद्योगिक वसाहतीत याची सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी स्थित ‘टाटा मोटर्स’ कंपनीमध्ये येथे २८ ते ३१ ऑगस्ट आणि ३ ते ६ सप्टेंबर अशा दोन टप्प्यात एकूण आठ दिवसांचा ‘ब्लॉक क्लोजर’ घेण्यात येणार आहे. मे महिन्याच्या ३० ते जूनच्या २९ तारखेपर्यंत व ५ ते १० ऑगस्ट दरम्यानही असाच ब्लॉक लोजर घेण्यात आला होता. अशाच रीतीने औद्योगिक उत्पादन व वाहन उद्योगाशी निगडित असलेल्या नाशिक येथील बॉश कंपनीतही सप्टेंबर महिन्यात ब्लॉक क्लोजर घेण्यात येणार आहे. या दोन मोठ्या कंपन्यांवर अवलंबून असलेल्या लघू उद्योजकांवर लघुउद्योजकांना व त्यात काम करणाऱ्या कामगारांना याचा मोठा फटका बसू शकतो. सध्या वाहन उद्योग फार मोठ्या संकटातून जात आहे. यात अनेक तज्ञ सरकारच्या धोरणांना सर्वस्वी जबाबदार ठरत आहेत.
हा सर्व घटनाक्रम देश आर्थिक मंदीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे सूतोवाच आहेत असे म्हणावयास हरकत नाही.