रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध राजापूरची गंगा ३१० दिवसांनी प्रकट
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध राजापूरच्या गंगेचं शुक्रवारी रात्री उशिरा आगमन झालं. आगमनानंतर गंगा चांगलीच प्रवाहित झाली असून सर्व कुंडांमध्ये पाण्याचं प्रमाण चांगलं आहे. गायमुखही प्रवाहित झालं आहे. राजापूरची ही गंगा पूर्वी दर तीन वर्षांनी येत असे.
मात्र गेली सुमारे दहा वर्षं ती दरवर्षी येत आहे. यावेळी ३१० दिवसांनी गंगा आली आहे. गंगेला भेट देण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं येतात. मात्र गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही कोरोना प्रतिबंधक संचारबंदीमुळे गंगेच्या ठिकाणी पोहोचायला प्रतिबंध करण्यात आला आहे.
Source – AIR
Photo – Vivek Marathe (Facebook)