“सर्व व्यवस्था कोलमडल्या असताना आणखी लोकसंख्या इतर देशातून घेण्याची आवश्यकता काय?” – राज ठाकरे गर्जले
पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुणे येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी देशातील सद्य परिस्थितीबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, “१३५ कोटी लोकसंख्येच्या देशात आधीच संसाधन अपुरी आहेत, सर्व व्यवस्था कोलमडल्या असताना आणखी लोकसंख्या इतर देशातून घेण्याची आवश्यकता काय? त्यापेक्षा आपल्या देशातील बांग्लादेशी, पाकिस्तानी व परदेशी घुसखोरांना हाकलून द्या.”
यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री व भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावरही तोफ डागली. ते म्हणाले की, “देशातील भीषण आर्थिक मंदिवरून संपूर्ण देशाचं लक्ष विचलित करण्यासाठीच नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाद्वारे वादंग उभा करण्याचा अमित शहांचा खटाटोप चालू आहे.”