निवडणूक आयोगाकडून आम्हाला शून्य अपेक्षा; आयोगाकडून अपेक्षाभंग झाल्याची राज ठाकरे यांची भावना
नवी दिल्ली: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर होते. तेथे त्यांनी मनसे नेत्यांसोबत देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तां सुनील अरोरा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आयुक्तांकडे मागणी केली की इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रा बद्दलच्या वाढत्या तक्रारी आणि त्यातील वस्तुस्थिती लक्षात घेता देशातील भवितव्याचा निर्णय म्हणजे सत्ताधीशांचे गणित होऊ नये आणि देशात निवडणूक प्रक्रियेवर असलेला लोकांचा विश्वास अबाधित राहावा आणि तो वृद्धिंगत व्हावा यासाठी महाराष्ट्रात येणारी निवडणूक अथवा भविष्यातील निवडणुका कागदी मतपत्रिकांवरच व्हाव्यात यासह अनेक मुद्यांचे व प्रश्नांचे अंतर्भाव असलेले निवेदन मुख्य निवडणूक आयुक्तांना दिले गेले.
आज दिल्लीत मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांनी मनसे नेत्यांसह मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली आणि मागणी केली कि, 'इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबद्दलच्या वाढत्या तक्रारी आणि त्यातील वस्तुस्थिती लक्षात घेता देशातील भवितव्याचा निर्णय म्हणजे सत्ताधीशांचं गणित होऊ नये… (१/२) pic.twitter.com/CowygFS0Wr
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) July 8, 2019
या भेटीनंतर मनसेतर्फे एक ट्विट करण्यात आलं ज्यात आजच्या बैठकीचं संक्षिप्त विश्लेषण करण्यात आलं आहे. ज्यात म्हटले आहे की, “निवडणूक आयुक्तांशी संवाद साधताना असं वाटलं की इतक्या महत्त्वाच्या समस्येवर आयोग फारसा गंभीर नाही त्यामुळे आम्हाला आयोगाकडून शून्य अपेक्षा आहे.” त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत उडत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.