बंद.. बंद.. बंद…आज मध्यरात्री पासून रिक्षा चालक-मालक संपावर
मुंबई: सध्या दिवस पावसाळ्याचे आहेत. या दिवसात रिक्षासाठी खूप झगडावं लागतं ही सर्वसामान्य माणसाची व्यथा पण आज रात्री १२ नंतर चे पुढचे २४ तास हे नेहमीपेक्षा जास्त त्रासदायक ठरणार आहेत. आज मध्यरात्री १२ ते मंगळवारी नऊ जुलै असे एकूण २४ तासांसाठी ऑटो रिक्षा चालक संपावर असणार आहेत.
अध्यक्ष शशांक राव प्रणित मुंबई ऑटो रिक्षा मेन्स यूनियन ने रिक्षाचालकांच्या काही प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला आहे. रिक्षा भाडेवाढीसह चालक मालकांना पब्लिक सर्व्हंट चा दर्जा मिळावा अशा युनियनच्या काही प्रमुख मागण्या आहेत.
ऑटोरिक्षा चालकांच्या प्रमुख मागण्या
१) हकीम कमिटीच्या रिपोर्टनुसार लवकरात लवकर रिक्षांची भाडेवाढ करण्यात यावी.
२) अवैध प्रवासी सेवेवर प्रतिबंध घालण्यात यावा
३) चालक मालकांसाठी घोषित केलेल्या स्वतंत्र सामाजिक सुरक्षा महामंडळाचे काम सुरू करण्यात यावे आणि रिक्षा चालक मालकांना पेन्शन आरोग्य इत्यादी सेवांचा लाभ द्यावा.
४) तीन वर्षांपेक्षा जास्त काळ ऑटोरिक्षा चालवणाऱ्या चालकांना त्वरित बॅज देण्यात यावा.
५) ऑटो रिक्षा चालक मालकांना पब्लिक सर्व्हंटचा दर्जा मिळावा.
६) ओला-उबेर सारख्या अवैध टॅक्सी कंपन्यांच्या रिक्षा सेवा त्वरित बंद करण्यात याव्यात.
७) ऑटोरिक्षा विम्याच्या प्रीमियमच्या दरात होणारी वाढ दरवाढ रद्द करावी.
८) नवीन ऑटो रिक्षा परवाने वितरण बंद करण्यात यावे.