विदर्भात वादळी पावसाची शक्यता, राज्यातील तापमानात वाढ
विदर्भात सर्वच ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडू व्यक्त करण्यात आली आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने राज्यात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाला पोषक हवामान निर्माण होत असल्याने पावसाची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
१८ व २१ मार्च रोजी विदर्भात सोसाटय़ाचा वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये कमाल तापमानात वाढ होत आहे.
मध्य महाराष्ट्रातील जळगाव, कोल्हापूर, पुणेआदी ठिकाणी कमाल तापमान ३७ अंशांच्या आसपास आहे.
सांगली,सोलापूर, मालेगाव या ठिकाणी कमाल तापमान ३९ तर वर्धा, अमरावती आणि परभणी या भागांत कमाल तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे.
विदर्भात नांदेड आणि अमरावतीचे कमाल तापमान ४० अंशांपुढे तर अकोला, यवतमाळ, चंद्रपूर आदी ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३८ ते ३९ अंशांवर आहे.