Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपला करून दिली ५०-५० आणि मुख्यमंत्री पदाच्या सूत्रांची आठवण

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपला करून दिली ५०-५० आणि मुख्यमंत्री पदाच्या सूत्रांची आठवण

मुंबई: शिवसेनेने आज मातोश्रीवर आपल्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक मातोश्रीवर बोलावली होती. या बैठकीत मुख्यमंत्री पद आणि ५०-५० टक्के सुत्रासाठी भाजपवर दबाव टाकण्याची व्यूहरचना झाल्याचे कळते.

बैठक संपल्यानंतर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, “निवडणुकीपुर्वी भाजप आणि शिवसेना यांच्यात ५०/५० फॉर्म्युला आणि अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद या बाबी ठरल्या होत्या आणि पत्रकार परिषदेत हे जाहीर करण्यात आले होते याची मी नम्रपणे आठवण करून देऊ इच्छितो. सत्तास्थापनेपूर्वी त्यांनी शिवसेनेला याची लेखी हमी द्यावी.”

पुढे आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाबाबत ते म्हणाले की, “युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे युवकांच्या गळ्यातील ताईत आहेत आणि ते मुख्यमंत्री व्हावेत अशी सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे. पण अंतिम निर्णय हा मा. पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचाच राहील.

एकूणच सध्या शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढल्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *