कांदा बाजारात आणण्यासंदर्भात चालू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर नाफेडने पत्रक काढत जाहीर केली भूमिका
नाशिक, दि. १४: नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या भावात सुधारणा होत असतानाच नाफेडच्यावतीनं बाजारात कांदा आणण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या संदर्भात नाफेडनं एक पत्रक काढून १५ सप्टेंबर नंतर कांदा बाजारात आणण्याबाबत निर्णय होणार असल्याचं जाहीर केलं आहे.
त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक भारत दिघोळे तसंच इतर शेतकरी संघटनांनी नाफेडचा कांदा बाजारात आणल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर नाफेडनं स्पष्टीकरण दिलं आहे.गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात आठशे ते दोन हजार तीनशे रुपये अशी सुधारणा झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादकात समाधानाचं वातावरण असतानाच कांदा दर नियंत्रित करण्यासाठी नाफेडचा बफर कांदा बाजारात आणण्यात येणार असल्याची चर्चा पसरली होती.