Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

जाणून घ्या आरबीआय चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी पंतप्रधान मोदींवर नेमकी टीका का केली

जाणून घ्या आरबीआय चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी पंतप्रधान मोदींवर नेमकी टीका का केली

मुंबई/नवी दिल्ली, दि. २६: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी २०४७ पर्यंत भारताला विकसित करण्याचे लक्ष्य ठेवल्याचे जाहीर केले होते. या संबंधात भारतीय रिझर्व्ह बँकेचे(आरबीआय) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आर्थिक क्षेत्रातील एक माध्यम असलेल्या ‘ब्लूमबर्ग’ शी बोलताना आपले मत व्यक्त केले. भारत हे लक्ष्य गाठू शकेल कि नाही असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता रघुराम राजन म्हणाले कि भारत आर्थिक विकासासंबंधी ज्या प्रकारचा प्रचार करत आहे ती फार मोठी चूक आहे. सध्याच्या घडीला देशात मोठ्या प्रमाणात संरचनात्मक समस्या असून ज्याचा निपटारा करणे गरजेचे आहे.

पुढे त्यांनी दावा केला आहे कि सन २०४७ पर्यंत भारत विकसित देश होऊ शकत नाही आणि मोठ्या संख्येने मुलं माध्यमिक शिक्षणही प्राप्त करू शकत नाहीत आणि  शाळांमधून विद्यार्थी गळतीचं प्रमाणही मोठं आहे असे असताना अशा लक्ष्याबाबत बोलणे पूर्णतः मूर्खपणा आहे. सध्याच्या घडीला शिक्षण व कामगारांच्या कौशल्यांमध्ये सुधारणा घडवून आणणे हे मोठे आव्हान आहे. आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी या आधीही नोट बंदिसह इतर अनेक आर्थिक धोरणांवर वेळोवेळी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर कडवी टीका केली आहे.

Photo Credit – रघुराम राजन Facebook Page

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *