महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडून करंजा – रेवस दहा आसनी नवी बोट सेवा सुरू
अलिबाग ते उरण हा प्रवास सुखकर करण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून दहा आसनी लहान बोट सेवा सुरू करण्यात केली आहे.
अलिबाग व उरणला जोडणाऱ्या करंजा खाडी किनाऱ्यावरून जलमार्गाने रेवस ते करंजा असा प्रवास दररोज हजारो प्रवासी करतात. त्यातच दर एक तासाने बोटसेवा उपलब्ध असल्याने प्रवाशांना दुसऱ्या बोटीच्या प्रतीक्षेत ताटकळत बसावे लागत होते त्यामुळे अनेक नागरिकांचे वेळेचे नुकसान होत होते. या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून दहा आसनी लहान बोट सेवा सुरू करण्यात आली आहे.
अलिबाग व उरण या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या जलप्रवासासाठी मेरिटाईम बोर्डाच्या परवानगीने बोटीची सोय केलेली आहे. या मार्गातील २० मिनिटांच्या प्रवासासाठी २० रुपये मोजावे लागत आहेत. रेवस- करंजा दरम्यान ही दहा आसनी बोट सेवा सुरू झाल्याने नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल. या बोट सेवेमुळे नागरिकांना एक बोट चुकल्यास दुसऱ्या बोटीच्या प्रतिक्षेसाठी ताटकळत बसावे लागणार नाही.
महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून हि बोट सेवा नव्यानेच सुरू करण्यात आली असून १८ ते २० मिनिटात प्रवासी अलिबाग ते उरण हा प्रवास करीत आहेत. या बोटीची क्षमता १० प्रवासी असून पुढील काळात जादा प्रवासी क्षमता असलेल्या बोटी येणार आहेत.