लिलावादरम्यान कमी भाव पुकारल्यानं, लासलगाव येथे कांदा उत्पादकांनी लिलाव प्रक्रिया पाडली बंद
नाशिक: नाशिकमधल्या लासलगाव कांदा बाजारपेठेत, आज सकाळी झालेल्या लिलावादरम्यान कमी भाव पुकारल्यानं, कांदा उत्पादकांनी लिलाव प्रक्रिया बंद पाडली आहे.
आज कांद्याला सरासरी चौदाशे रुपयांचा भाव जाहीर झाला होता. दरम्यान केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी ट्विट करून कांदा निर्यात बंदी उठवल्याचं म्हटलं होतं. मात्र अनेक दिवस उलटूनही त्याबाबतचा शासनादेश अद्यापही काढलेला नाही.
त्यामुळे जोपर्यंत कांद्यावरची निर्यातबंदी अधिकृतरित्या उठवली जात नाही तोपर्यंत नाशिक जिल्ह्यातल्या कोणत्याही बाजारपेठेत कांद्याची विक्री केली जाणार नाही असं राज्य कांदा उत्पादक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भारत दिघोळे यांनी म्हटलं आहे.
Credit – AIR