महाराष्ट्रातल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान
महाराष्ट्रातल्या मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातल्या काही ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे गहू, कापूस, संत्री मोसंबी अशा रब्बी पिकांचं नुकसान झालं आहे.
औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि परभणी इथं गेल्या दोन दिवसात पडलेल्या पावसानं कापूस, गहू, तूर, मका, केळी आणि आंब्याचं नुकसान झालं.
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस पडला, विदर्भामध्ये पावसानं संत्री आणि मोसंबी पिकांचं नुकसान झालं, तसंच वाशिम जिल्ह्यातही रब्बी पिकांचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे.
Credit – AIR