जाणून घ्या का कोजागिरी पौर्णिमेला मसाले दूध प्यायले जाते
आयुर्वेद कुतूहल
शरद ऋतूतील अंतिम टप्प्यात येणारा सण म्हणजे शरद पौर्णिमा ह्याच दिवसाला आपण कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतो.
पौराणिक मान्यतेनुसार रात्री जागर करून गरम चारोळी टाकलेले दूध ह्या रात्री प्रसाद म्हणून ग्रहण करतात. शरद ऋतु हा विसर्ग काळातील ऋतु असला तरी पाऊस नुकताच संपल्याने वातावरणात गरमी वाढू लागते, सूर्य तापू लागतो आणि त्यामुळे शरीरातील पित्त दोष वाढतो, अंगावर पित्त उटणे म्हणजेच लाल चट्टे उठण्याचे प्रमाण वाढते आधुनिक शास्त्रात त्याला Urticaria म्हणतात. ह्या दिवशी पिण्यात येणारे चारोळी युक्त खडीसाखर, हळद घातलेले दुध हे ह्याच पित्तासाठी उपयुक्त ठरते. तसेच पौर्णिमेचा चंद्राचा शीतल प्रकाश हा शरीरातील दाह कमी करण्यासाठी मदत करतो. म्हणूनच वैद्य इतर औषधांसोबत अशा प्रकारचे दूध सेवन करण्यास सांगतात. विशेषतः चारोळी आणि हळद ह्यात अधिक उपयुक्त ठरते. तसेच आहारामध्ये पित्त नाशक आहार असावा. दुधी, भोपळा, पडवळ अशा भाज्या मुगाचे वरण आहारात ह्या काळात अधिक असावे. आपला प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवतो आवश्यकता असते ती योग्य दृष्टीकोन ठेवण्याची.
भेटूया पुढल्या लेखात नवीन विषय घेऊन. तोपर्यंत,
आयुष्य जगा आयुर्वेदासंगे ।।
लेख आवडला असल्यास शेअर करा । LIKE करा । कंमेंट करा
वैद्य शार्दुल चव्हाण
एम. डी. आयुर्वेद
9987925720
जगदंब The Ayurvedic World ,
Ayurvedic Clinic and Panchkarma Center