जनतेच्या प्रश्नांची चांगली जाण असलेली आपली ‘बेस्ट टीम’ विस्तारानंतरच्या पहिल्या मंत्री परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई दि...
कोकण
Konkan
‘हे’ आहेत ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातील नवे ३६ मंत्री आज होत असलेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात २८ सदस्य कॅबिनेट...
खासदार छ. संभाजीराजे मातोश्रीवर, “या” तीन मुद्द्यांवर केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरें सोबत चर्चा मुंबई (प्र. मिथुन): रायगड...
रायगडावरचं दृश्य पाहून खासदार संभाजीराजे भडकले रायगड: भाजपचे राज्यसभेतील खासदार छत्रपती युवराज संभाजी राजे काल भलतेच भडकल्याचे...
राज्यात अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानाचं रब्बी आणि द्राक्ष बागांवर संकट राज्यात आज बहुतांश ठिकाणी हवामान ढगाळ...
एसटीच्या ‘स्मार्टकार्ड’ योजनेसाठी १ एप्रिल २०२० पर्यंत मुदतवाढ मुंबई: राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्यावतीने विविध सामाजिक घटकांना एसटी...
कोकण पर्यटन क्षेत्र विकासावर आणि शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनावर सरकारने भर द्यावे – आ. अनिकेत तटकरे आज...
आ. राजन साळवी यांनी दुग्धविकास मंत्र्यांकडे केली रत्नागिरी जिल्ह्यातील दूध उत्पादकांची थकीत रक्कम त्वरित देण्याची मागणी रत्नागिरी/नागपूर:...
आकाशवाणीच्या विशेष समारंभात होणार सत्कार नवी दिल्ली: रत्नागिरीच्या चैतन्य परब या बाल कलाकाराने आकाशवाणीच्या शास्त्रीय गायन (ख्याल गायन) स्पर्धेत देशातून दुसरा क्रमांक पटकाविला आहे. १७ डिसेंबर रोजी दिल्ली येथे आकाशवाणीच्या विशेष समारंभात चैतन्यला पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. आकाशवाणीच्या वतीने दरवर्षी संगीताच्या विविध प्रकारात स्पर्धा घेतल्या जातात. युवा कलाकाराला प्रोत्साहन आणि राष्ट्रीय मंच उपलब्ध व्हावा या उद्देशाने या स्पर्धांचे देश पातळीवर आयोजन केले जाते. ही स्पर्धा प्राथमिक आणि अंतिम फेरी अशा दोन टप्प्यात घेतली जाते. आकाशवाणी रत्नागिरी केंद्रात झालेली प्राथमिक फेरी यशस्वी पार पडून चैतन्यची दिल्लीतील अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. या अंतिम फेरीसाठी कोलकाता, दिल्ली, मुंबई, पुणे आदी केंद्रातून स्पर्धक दाखल झाले होते. तज्ज्ञ परीक्षक मंडळाने शास्त्रीय संगीत (ख्याल गायन) मुलांच्या गटात दिल्लीच्या पुलकित शर्मा याची प्रथम तर रत्नागिरीच्या चैतन्य परब ची द्वितीय क्रमांकासाठी निवड केली. चैतन्य हा रत्नागिरीतील अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीत शिकत आहे. चैतन्यने संगीताचे सुरूवातीचे शिक्षण त्याची आई विनया परब यांच्याकडे घेतले. गेली चार वर्षे तो किराणा घराण्याचे आघाडीचे गायक पं. जयतीर्थ मेवुंडी यांच्याकडे शास्त्रीय गायनाची तालीम घेत आहे. चैतन्यने सहाव्या वर्षी अखिल भारतीय गांधर्व मंडळाच्या गायनाची पहिली परीक्षा दिली. तसेच त्याने मंडळाची हार्मोनियममधील मध्यमा प्रथम ही परीक्षाही उत्तीर्ण केली आहे. चैतन्य सध्या गायनाची उपांत्य विशारद ही परीक्षा देत आहे.
रायगडाचा सर्वांगीण विकास रायगड किल्ला जतन व संवर्धन तसेच परिसर विकास करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पाचा काल मुख्यमंत्री...
