बोफोर्स तोफांचं अग्नितांडाव, ५० दहशतवादयांचा केला खात्मा
जम्मू-काश्मीर: रविवारी भारताने पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवादी तळ उध्वस्त केल्यानंतर कालही सोमवारी अजून सात दहशतवादी तळांना लक्ष केले. यावेळी ५० दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. रिपब्लिक वृत्तवाहिनीने ता संदर्भातले वृत्त सैन्यातील सूत्रांच्या हवाल्याने प्रसारित केले आहे.
भारताकडून यावेळी बोफोर्स तोफांद्वारे ३००० तोफगोळे डागण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्याचवेळी पाकिस्तान मधील नीलम-झेलम हायड्रोपॉवर प्रकल्पाच्या एका गेटचही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आद्यप पाकिस्तानच्या वतीने या मृतदेहांवर दावा करण्यात आलेला नाही.