पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल; लष्कर प्रमुख बिपीन रावत यांचा थेट इशारा
पाकिस्तान कडून सततच्या छुप्या अतिरेकी कारवाया चालू आहेत. या कारवाया न थांबल्यास त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल असे आज भारताचे लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले.
कारगिल युद्धाला वीस वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी ते म्हणाले की पाकिस्तानी सैन्य अतिरेक्यांच्या आड नित्य लष्करी कारवायांना प्रोत्साहन देत आहे पण आम्ही आमच्या देशाचं रक्षण करण्यासाठी सक्षम व कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी तयार आहोत. पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल. भविष्यातील युद्धां बाबत भाकीत करताना जनरल रावत म्हणाले की भविष्यात होणारी युद्ध ही जास्त विनाशकारी असतील आणि त्याचे परिणाम अनपेक्षित व भयावह असतील. या युद्धांत तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका राहील भविष्यातील या वृद्धांना ‘हायब्रीड युद्ध’ असे नाव देण्यात आले आहे.