“उठा उठा सत्ता गेली आंदोलनाची वेळ आली” जितेंद्र आव्हाड यांचा अण्णा हजारे यांना टोला
ठाणे: शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट करत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर टिप्पणी केली आहे. ते आपल्या ट्विट मध्ये म्हणतात, “अण्णा उठा कामाला लागावे लागेल
रामदेव बाबा आहेत तयार
उठा उठा सत्ता गेली
आंदोलनाची वेळ आली.”
२०११ साली अण्णा हजारे यांनी आंदोलन काँग्रेस विरोधात भ्रष्टाचार विरोधी आंदोलन केले होते. यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत सत्तापालट होऊन भाजपचं सरकार केंद्रात आलं होतं. शिवाय यासोबत त्यांनी अण्णा हजारेंचा आंदोलनातला एक फोटोही पोस्ट केला आहे.
अण्णा उठा कामाला लागावे लागेल
रामदेव बाबा आहेत तयार
उठा उठा सत्ता गेली
आंदोलनाची वेळ आली pic.twitter.com/EiXGmCnXZq— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 21, 2019