केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा काश्मीर संबंधी कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव
नवी दिल्ली: आज सोमवार दि. ५ रोजी राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीर साठी लागू असलेले घटनेचे कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव मांडला. सदर शिफारशीनंतर संसदेत एकंच गोंधळ उडाला. काँग्रेस नेते व खासदार गुलाम नबी आझाद यांनी काश्मीर मधील माझी मुख्यमंत्र्यांच्या नजर कैदेबाबत आक्षेप घेत त्यावर आधी चर्चा करण्याची मागणी केली.
गेल्या आठवड्यात भारतीय सैन्याचे जवळपास ३०,००० सैनिक काश्मीर साठी तैनात करण्यात आले आहेत. सरकारच्या आदेशानंतर अमरनाथ यात्रेकरूंनाही यात्रा अर्ध्यात सोडावी लागली. त्याचवेळी काल मध्यरात्री जम्मू काश्मीर च्या दोन माजी मुख्यमंत्र्यांना अनुक्रमे मेहबुबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्स चे अध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांना नजरकैदे करण्यात आलं.