“अलिबागवरुन आलास का?’ या वाक्यावर बंदी घालावी”, मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
मुंबई : “काय रे अलिबागवरुन आला आहेस का?”, असे बोलवून अलिबागकरांचा विनाकारण अपमान का केला जातोय? असा प्रश्न विचारत अलिबागचे रहिवासी राजेंद्र ठाकूर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
राजेंद्र ठाकूर यांच्या वतीने अॅड. रघुराज देशपांडे यांनी ही याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली. या याचिकेतून सीबीएफसी आणि राज्य सरकारच्या सांस्कृतिक खात्याने कोठार निर्णयाची अंमलबजावणी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
सेन्सॉर बोर्डाने कोणत्याही नव्या चित्रपट तसेच जाहिरात यांना प्रमाणपत्र देताना अशा प्रकारचा उल्लेख काढून टाकण्याचे निर्देश देण्याची प्रमुख मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.
अलिबागसारख्या महत्त्वाच्या पर्यटनस्थळाची या वाक्यामुळे बदनामी होते, असं याचिकेत म्हटलं