मनसेसोबत युती करणार का? या प्रश्नावर आदित्य ठाकरेंनी दिले ‘हे’ उत्तर…
मुंबई : भाजपसोबत युती केल्यानंतर, भविष्यात मनसेसोबत युती करणार का? असा प्रश्न युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना विचारला असता त्यांनी “सतत भूमिका बदलणाऱ्यांसोबत आपण जात नाही”, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मुंबईतल्या NSUI मध्ये आदित्यसंवाद हा कार्यक्रम पार पडला.
आज भाजपसोबत युती केल्यानंतर, भविष्यात मनसेसोबत युती करणार का?’ असा सवाल आदित्यसंवाद या कार्यक्रमात एका तरुणीने आदित्य ठाकरेंना विचारताच उपस्थित तरुणांमध्ये एकच हशा पिकला. या प्रश्नावर आदित्य यांनी आपल्या ठाकरे शैलीतच उत्तर दिलं.
शिवसेना आणि भाजपची भूमिका वर्षानुवर्ष कायम आहे. जे विरोधात आहेत, सतत भूमिका बदलतात, त्यांच्यासोबत शिवसेना कधीच गेली नाही असं म्हणत मनसेच्या बदललेल्या भूमिकेवर आदित्य ठाकरेंनी कडकडून टीका केली आहे.
युतीने आपले विचार, भूमिका कधीच बदललेली नाही. ही युती देशहितासाठी झाली आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. वरळीत पार पडलेल्या या कार्यक्रमाला
मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.