मागील ५ वर्षात बेस्ट बसला झालेल्या ८३४ अपघातात ८८ नागरिकांचा मृत्यू
मुंबई, दि. १३: गेल्या ५ वर्षात बेस्ट बस झालेल्या ८३४ अपघातात ८८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या कालावधीत मृत्यू पावलेल्या आणि जखमी झालेल्यांना ४२ कोटी ४० लाख रुपयांची भरपाई दिल्याचं बेस्टने माहितीच्या अधिकारात केलेल्या अर्जावरील उत्तरात सांगितलं आहे. या अपघातांमुळं १२ कर्मचारी बडतर्फ झाले तर २४ जणांचं निलंबन झालं. गेल्या ५ वर्षात बेस्टच्या मालकीच्या बसचे ३५२ अपघात झाले आणि कंत्राटदारांच्या बसचे ४८२ अपघात झाल्याचं बेस्टनं म्हटलं आहे.
Source – AIR
