भाजप सरकार आल्यापासून एकही दंगल नाही – योगी आदित्यनाथ
लखनौ: उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्था आता संपूर्ण देशासाठी एक आदर्श ठरणार आहे. भाजप सरकार सत्तेत आल्यापासून उत्तर प्रदेशात एकही दंगल झालेली नाही असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.
उत्तर प्रदेशात २०१७ मध्ये भाजप सरकारची सत्ता येण्याआधी राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करत तसेच हत्या, लूट आणि दंगली सुरु होत्या. उत्तर प्रदेशची सूत्र माझ्या हाती आल्यानंतर मी राज्याची प्रतिमा पूर्णपणे बदलली आहे, असा दावाही योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.
दंगल तर नाहीच पण अॅसिड हल्ला किंवा अपहरण यासारखे कोणतेच प्रकरण समोर आले नाहीत असं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं आहे.
योगी आदित्यनाथ यांनी भाजप सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आपले रिपोर्टकार्ड सर्वांन समोर सादर केलं आहे.