चौथ्या टप्प्यात राज्यात सरासरी ६० टक्के मतदान
सोमवारी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यात राज्यातील १७ मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं. राज्यात सरासरी ६० टक्के मतदानाची नोंद झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.सोमवारी पार पडलेल्या निवडणुकीत नंदुरबारमध्ये सर्वाधिक ६७.३४ टक्के मतदान झालं तर कल्याणमध्ये सर्वात कमी ४४.२७ टक्के मतदान झालं आहे.
राज्यात चार टप्प्यात सरासरी ६० टक्के मतदान झालं. राज्यातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी ८ लाख कर्मचाऱ्यांनी आपलं कर्तव्य चोख बजवाले, तर १ लाखांपेक्षा अधिक पोलिसांनीही यामध्ये उत्तम कामगिरी केली.
राज्यात सोमवारी उत्तर-पूर्व मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, उत्तर मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, नाशिक, दिंडोरी, पालघर, शिर्डी , शिरुर, मावळ, धुळे, शिर्डी, नंदुरबार या मतदारसंघात मतदान झालं.