Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

चौथ्या टप्प्यात राज्यात सरासरी ६० टक्के मतदान

चौथ्या टप्प्यात राज्यात सरासरी ६० टक्के मतदान

सोमवारी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यात राज्यातील १७ मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं. राज्यात सरासरी ६० टक्के मतदानाची नोंद झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.सोमवारी पार पडलेल्या निवडणुकीत नंदुरबारमध्ये सर्वाधिक ६७.३४ टक्के मतदान झालं तर कल्याणमध्ये सर्वात कमी ४४.२७ टक्के मतदान झालं आहे.

राज्यात चार टप्प्यात सरासरी ६० टक्के मतदान झालं. राज्यातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी ८ लाख कर्मचाऱ्यांनी आपलं कर्तव्य चोख बजवाले, तर १ लाखांपेक्षा अधिक पोलिसांनीही यामध्ये उत्तम कामगिरी केली.

राज्यात सोमवारी उत्तर-पूर्व मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, उत्तर मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, नाशिक, दिंडोरी, पालघर, शिर्डी , शिरुर, मावळ, धुळे, शिर्डी, नंदुरबार या मतदारसंघात मतदान झालं.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *