Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

आम्ही सावरकरांना मानत नाही, मानहानीचा दावा केला तरी चालेल; कन्हैय्या कुमारचं वादग्रस्त वक्तव्य

आम्ही सावरकरांना मानत नाही, मानहानीचा दावा केला तरी चालेल; कन्हैय्या कुमारचं वादग्रस्त वक्तव्य

नगर: भाजपने वीर सावरकरांना भारतरत्न देण्यासाठीचा मुद्दा आपल्या जाहीरनाम्यात टाकला आणि त्यावरून सुरू झालेलं राजकारण अद्याप शांत व्हायचं नाव घेत नाहीये. त्यात आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा वादग्रस्त नेता कन्हैय्या कुमार ने उडी घेतली आहे. आज नगर येथील एका पत्रकार परिषदेत त्याने भाजपच्या वचननाम्यावर टीका करताना वादग्रस्त विधान केलं.

यावेळी तो म्हणाला की सावरकरांना भारतरत्न देणं हा शहीद भगत सिंग यांचा अपमान असून त्यांना पुरस्कार देणं हा निवडणुकीचा मुद्दा होऊ शकत नाही. तो पुढे म्हणाला की आम्ही सावरकरांना मानत नाही, त्यासाठी मानहानीचा दावा केला तरी चालेल. या नंतर वीर सावरकर प्रेमींमध्ये एकच संतापाची लाट पसरली. ट्विटर वरही कन्हैय्या कुमारला ट्रॉलिंग करण्यास अनेक जणांनी सुरुवात केली.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *