Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त जाणून घ्या विवेकानंद केंद्राच्या बहुआयामी कार्याविषयी  

स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त जाणून घ्या विवेकानंद केंद्राच्या बहुआयामी कार्याविषयी

स्वामी विवेकानंदांच्या विचारांवर आधारित सेवाभावी संघटना म्हणजे ‘विवेकानंद केंद्र’. केंद्राच्या कामात जीवनव्रतींबरोबरच प्रापंचिक पुरुष आणि महिलांचाही मोठा सहभाग आहे. अशा हजारो पुरुष, महिलांचं या कामात मोठं योगदान आहे. विवेकानंद केंद्राचं कार्य बहुआयामी आहे.

कार्यपद्धती : योग वर्ग, स्वाध्याय वर्ग, संस्कार वर्ग व केंद्र वर्गाच्या माध्यमातून ‘मनुष्य निर्माण व राष्ट्र पुनरुत्थानाचं’ विवेकानंदांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न विवेकानंद केंद्र करीत आहे.

नैमित्तिक ५ उत्सव : समर्थ भारत पर्व (२५ डिसेंबर ते १२ जानेवारी), विवेकानंद जयंती (१२ जानेवारी) गुरुपौर्णिमा, श्री. एकनाथजी जयंती साधना दिवस (१९ नोव्हेंबर), विश्वबंधुत्वदिन (११ सप्टेंबर) व गीता जयंती हे उत्सव दरवर्षी केंद्रामध्ये साजरे केले जातात.

शिबिरे : अध्यात्मिक शिबीर, आरोग्य शिबीर, युवाप्रेरणा शिबीर, व्यक्तित्व विकास शिबिर अशा शिबिरांमधून अध्यात्मिक व व्यक्तित्व गुणांचा विकास साधण्याचा प्रयत्न केंद्र करते. तसेच कार्यकर्त्यांसाठी संस्कार वर्ग प्रशिक्षण व कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरेही घेतली जातात.

शिक्षण : ‘माणसातील पूर्णत्वाचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण’ या स्वामीजींनी सांगितलेल्या तत्त्वानुसार गुरुकुल पद्धतीने चालणारी ५८ विवेकानंद केंद्र विद्यालये अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड, अंदमान-निकोबार, कर्नाटक,  तामीळनाडू येथील दुर्गम भागात शिक्षणाचे कार्य करीत आहेत.

अरुणज्योती प्रकल्प : अरुणाचल प्रदेशातील संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी हा प्रकल्प आहे. अनौपचारीक मंच, स्वास्थ्य सेवा मंच, सांस्कृतिक मंच, युवा मंच व महिला मंच या पाच मंचांद्वारे सर्व लोकांना सामाजिक व राष्ट्रीय कार्यात सहभागी करण्यात येते.

विवेकानंद केंद्र प्रशिक्षण व सेवा प्रकल्प : केंद्राचा प्रशिक्षण व सेवा प्रकल्प त्रंबकेश्वरपासून ४ किलोमीटर जव्हार वरील फाट्यावर असलेल्या पिंपळद येथे आहे. या प्रकल्पामार्फत आरोग्य सेवा, स्वयंरोजगार मार्गदर्शन, शेती जलव्यवस्थापन व व गोसंवर्धन इत्यादी उपक्रम राबविले जातात. तसेच ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह व कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरे घेतली जातात.

प्रकाशन विभाग : केंद्राच्या चेन्नई, जोधपूर, गुवाहाटी आणि बडोदा येथील प्रकाशन विभागातर्फे मासिके, भित्तीपत्रके, शुभेच्छापत्रे व दैनंदिनी इत्यादी प्रकाशित होतात. तसेच केंद्राच्या ‘मराठी प्रकाशन विभाग’ पुणे येथून वैचारिक व आध्यात्मिक विषयांवरील विविध पुस्तकांचे प्रकाशन केले जाते. ‘विवेक विचार’ हे मासिकही सोलापूर येथून प्रकाशित होते.

विवेकानंद केंद्राच्या इतर प्रकल्पांची यादी : १) नैसर्गिक साधनसंपत्ती विकास २) ग्रामीण विकास प्रकल्प ३) विवेकानंद केंद्र संस्कृती संस्था ४) वैदिक दर्शन प्रतिष्ठान ५) विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन ६) अरुणज्योती प्रकल्प ७) अरुणाचल बंधू परिवार.

जीवनव्रती : अशा रीतीने संपूर्ण भारतात एकूण १००५ ठिकाणी शाखा, प्रकल्प व सेवाप्रकल्पांच्या माध्यमातून हे कार्य चालू आहे. या केंद्रकार्यासाठी तीस वर्षांपर्यंतच्या अविवाहित, पदवीधर तरुण-तरुणींची ‘जीवनव्रती’ म्हणून निवड केली जाते. पहिल्या वर्षी त्यांना तेव्हा सेवाकार्यांचे प्रशिक्षण देऊन नंतर पुढची तीन वर्षे प्रत्यक्ष कार्यानुभवासाठी, केंद्राची कामे सुरू असलेल्या आदिवासी भागात पाठविण्यात येते. या जीवनव्रती कार्यकर्त्यांच्या उदरनिर्वाहाचे उत्तरदायित्व केंद्राकडे असते. जीवनव्रतींच्या मदतीला समाजाचे ऋण मानणारे स्थानिक कार्यकर्ते असतात. शिवाय सेवाकार्य करू इच्छिणाऱ्या कोणालाही केंद्राच्या कामात सहभागी होता येते.

पारितोषिक योजना : केंद्राचे जीवनव्रती व सेवा भरती कार्यकर्ते घरदार सोडून पूर्णवेळ केंद्र-कार्यासाठी सहयोग देत असतात. त्यांच्या योगक्षेमाची जबाबदारी समाजाने स्वीकारणे अपेक्षित आहे. यासाठी परीपोषक योजनेद्वारे निधी संकलन केले जाते. वार्षिक पारितोषक, एकीकृत परिपोषक व अक्षय परीपोषक अशा विविध योजनांद्वारे हे निधी संकलन केले जाते. एकूणच स्वामी विवेकानंद केंद्राचे व्यापक कार्य हे अशा रीतीने अविरत चालू आहे.

स्रोत – स्वामी विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *