एसटी महामंडळ भरती प्रक्रिया नगरमध्ये सुरु
अहमदनगर विभागातील एस. टी. महामंडळाच्या चालक-वाहकांच्या ५६ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. वाहन चालन चाचणीतील गुणांना ६० टक्के व लेखी परीक्षेतील गुणांना ४० टक्के महत्त्व दिले गेले आहे. मुलाखती न घेता गुणवत्ता व जातनिहाय प्रवर्गानिहाय अंतिम निवड होणार आहे.
www.msrtc.gov.in व www.msrtcexam.in या संकेतस्थळांवर भरती प्रकियेची सविस्तरपणे माहिती देण्यात आली आहे. चालक-वाहक पदांच्या भरती प्रक्रियासाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक १५ फेब्रुवारी २०१९ रोजी रात्री ११ वाजून ५९ पर्यंत आहे.