भारत आणि सिंगापूर दरम्यान २९ नोव्हेंबर पासून विमान सेवा
भारत आणि सिंगापूर सरकारने दोन्ही देशांदरम्यान व्यावसायिक विमान सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २९ नोव्हेंबर पासून सिंगापूर आणि भारतातल्या चेन्नई, दिल्ली आणि मुंबई या शहरांदरम्यान दिवसाला एकूण सहा विमान फेऱ्या सुरु होणार असल्याचं सिंगापूर विमान प्राधिकरणानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. लसीकरण पूर्ण झालेल्या भारतीय प्रवाशांना सिंगापूरसाठी अल्प आणि दीर्घ मुदतीचे प्रवासी परवाने देण्याची अर्ज प्रक्रिया आजपासून सुरु होत असल्याचं यात म्हटलं आहे.