“शिवसेनेने, पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात जे केले ते खुले आम केले” – शिवसेना भाजपवर कडाडली
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांच्या शिवसेना-राष्ट्रवादी संदर्भातील वक्तव्यांनंतर भाजपने केलेल्या वक्तव्यावर शिवसेनेने आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना प्रवक्त्या आ. डॉ. मनीषा कायंदे म्हणाल्या की, “देवेंद्र जी युती शिवसेनेने नाही भाजपनेच तोडली २०१४ मध्ये. लोकसभेच्या २०१४ च्या मोदी लाटे नंतर विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी भाजपने युती तोडली , आपल्या नेतृत्वात एकनाथ खड़से यानी युती तुटल्याची घोषणा केली होती, भाजप शिवसेना वेगवेगळे लढले आणि सर्व शक्तिमान भाजपला तेव्हाही बहुमत मिळाले नव्हतेच, केवळ १२२ आमदारांच्या जोरावर तेव्हा आपण सत्ता स्थापन केली तेव्हा कोणते अदृश्य हात आपल्या मागे होते ते सांगा आधी !
शिवसेना स्वतंत्र राजकीय पक्ष आहे तेव्हा भाजप जर २०१४ मध्ये राष्ट्रीय स्तरावर पूर्ण बहुमतात सत्तेत आल्यावर सतत शिवसेनेचे खच्चीकरण करू पाहत आहे हे लक्षात आल्यावर शिवसेनेने आपला स्वतंत्र बाणा जपून राजकीय सोयरीक करण्याचा प्रयत्न केला ही असला तर त्यात वावगे काय?
पुढे त्या म्हणाल्या की, “शिवसेनेने, पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात जे केले ते खुले आम केले आपल्याच युतीतील सहकारी पक्षातील लोकांचे आणि आपल्याच पक्षातील नेत्यांचे छुप्या पद्धतीने खच्चीकरण करण्याचे कारनामे कधी उद्धव साहेबांनी केले नाहीत.
अशी प्रतिक्रीया शिवसेना प्रवक्ता आ. डॉ. मनीषा कायंदे यानी व्यक्त केली आहे.”
यावर आता भाजप काय प्रतिक्रिया देते हे पाहणे लक्षणीय ठरेल.